शिवाजी महाराज आणी संभाजी महाराज यांच्या काळातील झालेल्या शिक्षा किंवा चुकांबद्दल झालेली कान उघाडणी १)बाबाजी भिकाजी गुजर (आपण सारे त्याला इतिहासात “रांझ्याचा पाटील” म्हणून ओळखतो.) , विवाहीत स्त्री सह “बदअमल” केला म्हणून कोपरा पासून दोन्ही हात तोडले , गुडघ्या पासून दोन्ही पाय तोडले. “चौरंग “ केला...ही शिक्षा शिवाजी महाराजांनी दिली तेव्हा त्यांचे वय अवघे १६ वर्षांच्या आसपास होते. २) छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले मुख्य प्रधान अथवा पंतप्रधान (पेशवे) शामराजपंत निळकंठ पद्मनाभी उर्फ रांझेकर यांनी एका प्रकरणात एकाचे कुलकर्णी पद जबरदस्तीने (आपल्या अधिकाराचा गैर वापर करून) आपल्या नावावर करून घेतले. हे शिवाजी महाराजांच्या लक्षात येताच तत्काळ त्यांना त्या पद वरून बडतर्फ करून ते पद मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांना दिले गेले. ३)खंडोजी खोपडे , मावळातील एक देशमुख , अफझल खानाला फितूर झाला म्हणून त्याचा उजवा हात व डावा पाय कलम करण्याचा आदेश शिवाजी महाराजांनी दिला आणी त्याची अंमल बजावणी तत्काळ झाली. ४).मुधोळ चे बाजी घोरपडे , शहाजी महाराजांना आदिलशाही तर्फे कपटाने कैद करण्यात यांचा हात होता. ...
Posts
Showing posts from July, 2019